पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - साधकाचा पिंड धर्म व अनुवंशिकता

  प्रश्न क्र. 35 :- साधकाचा पिंड धर्म व अनुवंशिकता, की जो पूर्वजांच्या जीनस् मधून प्राप्त होतो याचा काही संबंध आहे काय ? एकाच वंशवेलीतील वेगवेगळ्या पिंडधर्मीयांच्या व्यक्ती असू शकतील काय ? असू शकतात ! वंशवेलीचा विचार केला तर सर्रासपणे ऐकायला येणारे वाक्य 'कुळाच नाव काढलं किंवा कुळाला बट्टा लावला.' यावरून कुलाभिमान दिसतो. वंशपरंपरेने चालत आलेला कुळाचार सर्व कुळात पाळतात. कुळाचार करणे हा एक संस्कारांचा भाग आहे. ते पाळले तर संस्कार मनावर रुजले जातात नाहीतर 'येरे माझ्या मागल्या.' प्रयत्नांवर जीवात्म्याचे ऊर्ध्व व अधोगमन (Up and down) ठरते. आणि एकच वंशवेल वेगवेगळ्या पिंडधर्माने बहरलेली असते. म्हणून "माझा मुलगा माझ्यापेक्षा निराळ्या पिंडधर्माचा आहे असे म्हणतात." जीवात्मा गर्भाशी शत-प्रतिशत गुण जुळल्याची खात्री पटल्यावरच गर्भात प्रवेश करतो. मग त्याप्रमाणे गुण प्राप्त होणारच. पण प्रयत्नांनी त्यांत उत्क्रांति होऊ शकते. उत्क्रांतीनेच अमीबाचा मानव झालाय ना ! पण तसा प्रयत्न केला पाहिजे. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे.' प्रयत्न न करता उत्क्रांती शक्य न...

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - राहू -केतू

प्रश्न क्र. 34 :- राहू -केतू सूर्य-चंद्राला गिळतात व त्यामुळे सूर्य-चंद्राला ग्रहण लागते !! या कथेचा व्यास आशय काय आहे ? आजचे खगोलशास्त्र प्रगतीपथावर आहे. निरनिराळे उपग्रह व अवकाश यान अंतराळात सोडून नवनवीन विक्रम केले जात आहे. पृथ्वीचा उपग्रह चंद्रावर मानवाने पाऊल आधीच टाकले आहे. आणि आता मंगळावर स्वारी करून यानाद्वारे संशोधन सुरू आहे. पृथ्वी व्यतिरिक्त अजून ब्रम्हांडात कुठे मानवी जीवन आहे, त्याचा शोध सुरू आहे. या सर्व अवकाश मोहिमेत ग्रहांच्या गती व स्थान आणि यानाचा वेग याचा सखोल अभ्यास करून संभाव्य मोहीम आखली जाते. वैज्ञानिक हे या युगातील ऋषीच समजावे. कारण या साऱ्या घटनांचे वैदिक काळातील ऋषींना सुद्धा "अतींद्रिय ज्ञान" असले पाहिजे. म्हणून त्यांनी त्याकाळीसुद्धा अशा कथा लिहून ठेवल्यात की आजच्या वैज्ञानिकांना ते अवकाश संशोधनात पथदर्शक ठरतात.   सूर्य-चंद्राला ग्रहण लागते. ग्रहण म्हणजे आत्मसात करणे किंवा गिळणे. एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे म्ह...

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी

  प्रश्न क्र. 33 :- चित्त, मन व बुद्धी यांना परमार्थ साधनेमध्ये बरेच महत्त्व आहे,   त्यांचा परस्पर संबंध कसा येतो ? तसेच अहंकाराचे उगम स्थान वरील कशात आहे ?   चित्त :-   प्रत्येकांत परमेश्वराचा अंश असतो. आत्म्यातील परमेश्वराचे उच्च अस्तित्व म्हणजे चित्त. पाण्याच्या बुडबुड्यांत ज्याप्रमाणे संपूर्ण पाण्याचेच स्वरूप असते. तसे विश्वातील चैतन्याचे आकलन चित्ताने होते. चित्ताचे दर्शन म्हणजेच परमेश्वरदर्शन. मन :- चित्ताच्या खालची अवस्था म्हणजे मन. शरीराला धरून संस्कारांमुळे जी अवस्था प्राप्त होते. त्या अवस्थेस मन म्हणता येईल. शांत पाण्यात दगड फेकल्याने कंपने निर्माण होतात. त्याचप्रमाणे संस्कारानुसार मनात कंपने निर्माण होतात. चांगली कंपने निर्माण होण्यासाठी सुसंस्कार आवश्यक असतात. मन शांत झाले की चित्त शांत होते. शुद्ध मनामुळे विकल्प निर्माण न होता आत्मदर्शन घडते. म्हणून मनावर सुसंस्कार व्हावेत. संकल्प आणि विकल्प हा मनाचा धर्म आहे. बुद्धी :- मनाच्या वर बुद्धी असते. बुद्धी म्हणजे काय ? उपनिषद सांगतात आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।   बुद्धिं तु सारथिं विद्धि...

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - शुक ऋषी / पोपटाचे शिर

प्रश्न क्र. 32 :- शुक ऋषी यांना पोपटाचे शिर दाखवतात. ह्यामागे काय आशय असावा ? विचार विनिमय आणि समाधान ः विषय सुरू करण्यापूर्वी ज्यांनी 'भागवत' पुराण लिहिले त्या भगवान वेदव्यासांना अभिवादन करतो. त्यांच्या नामाभिधाना- तील आशय सांंगणे अगत्याचे वाटते म्हणून हा आशय प्रकट करीत आहे. भूमिती शास्त्रात व्यास म्हणजे वर्तुळातील वर्तुळ-मध्यातून जाणारी नि परीघाच्या दोन्ही अंगांना मिळणारी सरळ रेषा म्हणजे 'व्यास'(Diameter) ही व्याख्या केलेली आहे. संसाररुपी वर्तुळावर आपण सारे भ्रमण करीत असतो. यातील एखादा ज्ञान प्राप्त करायला वर्तुळ-मध्यात जावून आणि ज्ञान प्राप्त करून ते ज्ञान स्वतः जवळ न ठेवता सर्व जगाला देण्यासाठी पुनः संसार रुपी वर्तुळ परीघावर येतो. हा एखादा अर्थात भगवान 'वेदव्यास' होय. ही परिभाषा योगी मनोहरांनी साधकांना सांगितली आहे. हा व्यास आशय सांगणाऱ्या योगी मनोहरांना (पूज्य काकाजींना) वंदन करुन आपण प्रस्तुत विषयावर येवू. 'शुक' मुनी हे भगवान व्यासांचे' पुत्र ! एकदा स्वर्गातील एक 'घृताची' नामक अप्सरा 'शुकीचे' रुपात भ्रमण करीत होती. ...

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - पुनरजन्म कधी होतो

प्रश्न क्र. 31:- पुनरजन्म कधी होतो ? प्रश्न लहान पण रहस्य महान. अशा या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात देणं आणि समजून घेणं दोन्ही अवघड आहे. एखाद्या खाणीतून मौल्यवान वस्तू शोधण्यासारखं आहे. अथवा अथांग सागरातून मोती मिळणे होय. जीवात्मा शरीरात प्रवेश करताना आणि शरीर त्याग करताना आपल्यासह मन आणि पंचज्ञानेंद्रिय घेऊन येतो व घेऊन जातो. जीवावर झालेल्या कर्मसंस्कारामुळे जीवाला पुनः पुनः जन्म घ्यावा लागतो. यालाच आपण पुनर्जन्म म्हणतो. जीवात्म्याच्या प्रकृतिस्थ कर्षण अवतरणाला 'जन्म' असे म्हणतात. जन्मघटनेकरता दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक जीवात्मा तर दुसरे त्या जीवात्म्याचे योग्य असे पृथ्वितलावरील गर्भशरीर ! त्या जीवात्म्याचे योग्य असे मातृगर्भस्थ शरीर उत्पन्न होई पर्यंत जीवात्मा जन्म घेऊ शकत नाही. असले सुयोग्य शरीर अगोदरच असेल तर जीवात्मा येथून निघून त्या अन्य गर्भात कर्षिल्या जाईन. असे नसेल तर तसले सुयोग्य शरीर मातृगर्भात उत्पन्न होईपर्यंत त्या जीवात्म्याला तितका काळ अवकाशस्थ पितृलोकांत राहावे लागेल. त्याला त्या अगोदर जन्म नाही. म्हणून जीवाला मृत्युनंतर जन्म घेण्याचा अवधि एका क्षणापासून...