कुंडलिनी शक्ती- ज्ञान विज्ञान -21
उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानंवसादयेत् I आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः I ( अ.६ – श्लोक ५ ) मनुष्याने स्वत:चा उद्धार स्वतःच्या प्रयत्नानेच करायचा असतो. स्वतःला अधोगतीस जाऊ देऊ नये. आपणच आपले बंधू व आपणच आपले शत्रू असतो.दुसरा किंचित सहाय्य करेल. उद्धार नव्हे. डोक्यावर हात ठेवून अथवा पत्राद्वारे कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न अशास्त्रीय अतएव भ्रामक आहे. केवळ भावना विवशतेमुळे कुंडलिनी जागृत झाल्यासारखी वाटेल पण खऱ्या अर्थाने ती जागृत होणार नाहीच. साधकांनी आपला विवेक सतत जागृत ठेवून साधना करावी. भावनेचा आवेग ओसरल्यानंतर, त्या व्यक्तिला व्यथाविकार उत्पन्न होऊन प्रसंगी त्या व्यक्तीचे अध:पतनसुद्धा होऊ शकते. रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रात याची अनेक उदाहरणे दिली आहेत. एक मुलगा कुंडलिनी जागृत होत असताना भावनातिरेकाने प्रत्येकाच्या पायाची धुली आपल्या माथ्याला लावायचा. त्याची ती अवस्था पाहून रामकृष्णांनी संबंधित लोकांना त्याला सांभाळण्यास सांगितले, अन्यथा तो मुलगा अध:पतित होईल असे स्पष्ट बजावले आणि झाले तसेच. काही दिवसानंतर तो मुलगा सर्व ...